भारतीय संघाचा पाकिस्ताननं भारतात जाऊन पराभव करावा – शोएब अख्तर

0

लाहोर : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमान आहे, परंतु आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीसीबीनंही काही अटींसह हे मान्य केलंय. पीसीबीनं रेव्हेन्यूमध्ये जास्त वाटा आणि भारतात होणाऱ्या आयसीसी स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेलची मागणी केली. या पार्श्वभूमीवर शोएब अख्तरने म्हटले की, पीसीबीची ही मागणी केली ठीक आहे, मात्र पाकिस्ताननं भारतात जाऊन तिथे भारतीय संघाचा पराभव करावा. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहे. यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत ही स्पर्धा पाकिस्तानातच व्हावी, यावर पाकिस्तान ठाम होता. मात्र, भारत यासाठी तयार नव्हता. आता स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवण्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुलाखत देताना शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानने एक मजबूत आणि योग्य भूमिका राखली पाहिजे. आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यास सक्षम आहोत आणि भारतीय संघ यायला तयार नाहीत, तर हा एक चांगला निर्णय आहे. पीसीबीनं भविष्यातील आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा आणि असा संघ तयार करावा जो भारताला भारतात जाऊन तिथे पराभूत करू शकेल. भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीनं आपण भारताशी मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि भारतात जायला हवे. भारतात खेळा आणि तिथे जाऊन त्यांना हरवा यावर माझा नेहमीच विश्वास आहे. असं मला वाटतं, हायब्रिड मॉडेलवर आधीच करार झाला होता. असा खुलासाही यावेळी शोएब अख्तरनं केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech