नागपूर दंगलीमागे बांगलादेशी आणि मालेगाव येथील संबंध ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई : नागपूर दंगलीसाठी शिवप्रेमींना जबाबदार धरणे चुकीचे आहे. ‘नागपूरची दंगल हिंदूंनी घडवली’, असा खोटा नरेटिव्ह पसरवला जात आहे. मतांसाठी चाललेली ही लाचारी संतापजनक आहे. नागपूर दंगलीमागे बांगलादेशी आणि मालेगाव येथील संबंध आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान परिषदेत अंतिम आठवडा चर्चेला ते उत्तर देत होते. या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले,‘‘औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे राज्यातील वातावरण बिघडवत आहेत. मतांसाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण चालू आहे. देशभक्त मुसलमान औरंगजेबाचे उदात्तीकरण करू शकत नाहीत. औरंगजेब महाराष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी आला होता. त्याचे उदात्तीकरण हा देशद्रोह आहे. जे सामाजिक तेढ निर्माण करतील, त्यांना दयामाया दाखवली जाणार नाही.’’
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या वेळी सर्व आश्वासने पूर्ण करू. आश्वासने पूर्ण झाल्याविना स्वस्त बसणार नाही. आमचे आश्वासन म्हणजे काळ्या दगडावरील भगवी रेख आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सरकारने घोषित केले त्याप्रमाणे पैसे मिळतील. ’’ बस राज्यातील गावागावात पोचते. एस्.टी.ही गरीबांची जीवनवाहिनी आहे. राज्यातील सर्व विश्रांतीगृह चांगले असायला हवेत. राज्यातील बसस्थानकांवरील विश्रांतीगृह चांगली असायला हवीत. ज्या प्रमाणे ‘एअरपोर्ट’ आहेत. त्याप्रमाणे बसस्थानके असायला हवीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech